हें जेव्हां अनुभवा आलें ।
तेव्हाच ’ अल्पज्ञ आम्ही ’ कळलें ।
म्हणोनि तुझ्या नामी वेधलें ।
चित्त सर्वतोपरी ॥१५॥– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)
अर्थ: ह्या गोष्टींचा जेंव्हा अनुभवल्या तेव्हा आपण किती कमी ज्ञानी आहोत याची जाणीव झाली. यासाठी तुझ्याकडे आकर्षित झालो. तुझ्याकडे एकचित्त झालो.